Saturday, 31 December 2022

नये साल की हो अगवानी. !

                                                    इमेज@ गूगल 
                                                 


                                                बंद करे हम पिछला खाता 

                                               नये साल की हो अगवानी. !

                 नव्या वर्षाचं स्वागत आणि जुन्या वर्षाचं निरोप सांगणारी कविता सातवीला हिंदीच्या पुस्तकात होती. या कवितेला आणि आपल्या आयुष्याला जोडायला शिकलो आहे .नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सर्व जण सज्ज आहोत. 

                जाणाऱ्या वर्षातून आपण नक्कीच काही तरी शिकलो असणार..आपल्या आयुष्याची उदिष्ट, ध्येय याचा आपण सर्व जण पाठलाग करत आहोत.. काही पूर्ण झालीत,तर काही अजून बाकी आहेत. अपूर्ण राहिली म्हणून नाराज होण्याची गरज नाही. येणाऱ्या वर्षी पूर्ण करण्याची संधी आपणास लाभत आहे. कारण,

                                          पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!

                २०२० वर्षाच्या कोरोना संकटातून आपण सुखरूप वाचलो याच भान प्रत्येकाने ठेवायला हवे.. त्यामुळे आपला पुनर्जन्मच झाला आहे असू समजू. पुन्हा एक संधी म्हणून आपण याकडे पाहुयात.. म्हणुनच आपण आपल्या मिळालेल्या आयुषाबदल कृतज्ञ असायला हवे..

  नव्या संकल्पाचा निर्धार

                 तसे सारेच बदलत असते. ऋतू बदलतात,वर्ष बदलतात. पण बदलत नाहीं ते सजगपणे जग जाणून घेण्याची , सारे विवेक बुद्धीने समजून घेत स्वतःला विचार समृध्द करण्याची आकांक्षा(लोकसत्ता). आपल्यातल्या जिज्ञासू वृत्तीला आणखीन प्रखर करण्याचा निर्धार करू..

                या जगात, मानवात जे काही चांगले आहे,ते प्राप्त करण्याचा आणि पुढील पिढीकडे हस्तांतर करण्याचा दृढ निश्चय करूयात. विश्वाकडे आपण सर्वोत्तमच मागू..

                       तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे

                   जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे!

           आपणाला जे काही उत्तम लाभते त्याचा आपल्या समाजाला ,देशाला पण लाभ झाला पाहिजे. तरच आपल्या आयुष्याचं सार्थक झाले असे समजावे.कारण आपल ते सामाजिक देणं आहे..म्हणूनच समाजात व आपल्याला भेटलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात चिरकाल टिकणारा आनंद निर्माण करूयात.

           'असं म्हणतात प्रत्येक व्यक्तीची भेट होण्यात काही तरी कारण असत.'     मागील वर्षात अनेक व्यक्तींची ओळख झाली असेल.काही जणासोबत अनोखे नाते निर्माण झाले असेल. त्या सर्वांचं मनापासून आभार,🙏🙏🙏 मानुयात. काही कारणामुळे काही जण आपल्यापासून दूर असतील .पण मला खात्री आहे आपली माणस पुन्हा आयुष्यात येतात..

                प्रत्येक व्यक्तीला भूतकाळ असतो. काहीसां गोड तर काही कटू. भूतकाळ गोड, चांगला असेल तर उत्तम.नसेल तर गेलेल्या काळाचा विचार करून येणाऱ्या भविष्याच नुकसान करू नये.कारण आपल्या भूतकाळाला डिलीट button नसते..त्यामुळे तो delete करता येत नाही..मात्र सुंदर ,आनंदी भविष्य घडविण्याचे बटन आपल्या हातात आहे. आपणच आपलं भविष्य निर्माण करू शकतो ,कारण आपणच स्वतःचे भाग्य विधाते आहोत.म्हणुनच आपल्या उद्दीष्टचा, स्वप्नाचा पाठलाग करणे सोडू नका. स्वतःचा "स्व " ओळखा. 

               आपण जेव्हा जन्माला आलो त्यापेक्षा सुंदर जग बनवण्याचा संकल्प करुयात.. आपली उदिष्ट ,स्वप्न ही नेहमी पूर्ण होतात फक्त आपली त्यावर अढळ श्रद्धा असली पाहिजे..ओम शांती ओम चित्रपटात डायलॉग आहे ना

                   अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी

          कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।

      अशीच विश्वातील सर्व शक्ती, आपल्या पाठीशी उभी राहू हीच मनोकामना .

         चला तर आता गत वर्षाचे सिंहावलोकन करूयात आणि येणाऱ्या वर्षी जी धेय्य, उद्दीष्ट अपूर्ण राहिली त्यांचा पाठलाग करूयात. प्रत्येक क्षण आनंदात, समाधानात जगुयात . कोणाबदल असूया न बाळगण्याचा निर्धार करूयात कारण

                       हर पल यहा जी भर जियो

                    जो है समा ओ कल हो ना हो|

आयुष्याच्या आणखीन एका innings साठी जिद्दीनं, उमेदीने तयार होऊयात, आणि आपली सर्व ईप्सिप्त साध्य करुयात. माझ्या सर्व वाचकांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!!!!💐💐💐💐


   @प्रलय लतिका भारत सावंत

     १ जानेवारी २०२३







Monday, 5 December 2022

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏



        "तू दाखविली जगाला नवी मानव नीती

         तुझी ख्याती गाजते या जगती

         लोटून गेले वर्ष किती

       तरी आजही बोलवते ती चैत्त्यभूमीची माती."

      

          ६ डिसेंबर १९५६ रोजी मानवतेचा मुक्तिदाता , अस्पृश्यांचा कैवारी,स्त्री उद्धारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले .. बाबासाहेबांचे आणि मानव जातीचे घनिष्ट असे नाते आहे.. मानवी हक्कासाठी , रक्तविरहित मार्गानें लढणारे ते युगपुरुष होते. म्हणूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतातून जनसागर चैत्यभूमीवर येतो.  

         डॉबाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजले, आणि भारतीयांच्या आयुष्यात न्यायाचा,समतेचा, बंधुत्वाचां, लोकशाहीचा सुगंध पसरवून गेले.

          बाबासाहेबांचं अलौकिक कार्य त्यांना अजरामर करून गेले.. त्यांची प्रेरणा,स्वप्न., भारतीयाच्या मनात जीवंत आहेत. शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा.. हा त्यांचा संदेश आजही अनेकांना आपला मार्ग दाखवत आहे..शिक्षणाचं महत्त्व त्यांनी खालील शब्दात विषद केले आहे 

       शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

    - डॉ बाबासाहेब आंबेडकर(१८९१-१९५६)

शिक्षणामुळे माणसाचा स्वाभिमान जागृत होतो..तो आपल्या अणि इतरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरणा देतो . शिक्षणानेच राष्ट्राची उन्नती होतें.त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तुम्ही तुमच्या शिक्षणाने भारताची घटना लिहून आपल्या देशाचे भाग्य ठरवले . तुम्ही भारताचे भाग्य विधाते ठरला..

    हजारो वर्ष प्रचलित असलेल्या मनुस्मृती वर आधारलेल्या व्यवस्थेला, विषमतेला, नेस्तनाबूत केले..बाबाआपण लिहलेल्या संविधानान आपला भारत देश चालतो..संविधानाची प्रत्येक तरतूद तुमची आठवण करून देते.

     बाबा तुम्ही दिलेले अधिकार, शेतकऱ्यांचे ,कामगारांचे, स्त्रियांचे,समतेचा, न्यायाचा अधिकार दररोज तुम्ही सोबत असल्याची जाणीव करून देतात.  तुम्ही दाखवलेली नवी आर्थिक किरणे भारताला आज मार्गदर्शक ठरत आहेत.भारत भूमीवर बुद्ध धर्म स्वीकारून पुन्हा या भूमीवर प्रज्ञा ,शील, करुणा आणि पंचशील यांना पुनर्जीवित केले..

  आपल्या १८९१-१९५६ एवढ्या कारकीर्दीत ऐतिहासिक रक्तविरहीत सामजिक क्रांती घडवून नवा मापदंड निर्माण केला...आपण कायदेतज्ञ,पत्रकार,घटनातज्ञ, अर्थतज्ज्ञ,मानववंश शात्रज्ञ इ.होता.

 आपल्या थक्क करणाऱ्या प्रवासाकडे पाहून आपला

"Life should be great than long". हा संदेश सार्थ ठरतो...

अशा या ज्ञानाच्या महासागरास, मुक्तिदात्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏


जय भीम 

प्रलय भारत सावंत

६ डिसेंबर २०२२


महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...