Saturday, 26 November 2022

भारतीय संविधान दिन !!!

 

                       सौजन्य Google

संविधान दिन 

         नव्याने स्वतंत्र झालेल्या भारत देशाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ,सामाजिक,अर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करणारे , बंधूभाव जोपासणारे, व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारे, आणि राष्ट्राचे एकता व एकात्मतता राखणारे संविधान स्वीकारुन देशाने आपल्याला प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण होण्यास कटिबध्द केलं...

    आपल्या उदेश पत्रिकेची सूरवात "आम्ही भारताचे लोक" या पासून सुरू झाली आहे ... भारत देशातील सत्ता, अधिकारकेंद्र ही भारतीय नागरिकांच्या हातात आहे.. भारताचे नागरिकच भारताचे भाग्यविधाते आहेत. असा त्याचा अर्थ ध्वनित होतो.

           लोकशाही मूल्यं हीच भारताला पोषक आहेत याची खात्री घटनाकारांना होती.. सामाजिक विषमतेमुळे,मनुवर आधारलेल्या व्यवस्थेने समान संधी , माणूस म्हणून हक्क नाकारले होते..हेच कटू वास्तव स्वीकारुन लोकशाही वर आधारित लिखित संविधान स्वीकारुन प्रत्येक व्यक्तीला कायद्या पुढे समान बनवले..प्रत्येकाच्या हक्काचे रक्षण ,प्रत्येकाला समान संधी ची लिखित हमी दिली गेली... कायद्याचे राज्य , कायद्यापुढे समानता ही तत्व या भारत भूमीवर निनादु लागली.  

पार्श्वभूमी        

            2 वर्ष 11 महिने 18 दिवस असे सर्वसमावेशक असे संविधान निर्मितीसाठी लागले. संविधान निर्मिति साठी अनेक समित्या होत्या. त्यात मसुदा समिती सर्वात महत्वाची समिती होती.. याच समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.. त्यांना अनेक विद्वान जसे बी एन राव इ.सारख्याचे सहाय लाभले . बाबासाहेबांनी जगातील ५० हून अधिक संविधानाचा अभ्यास केला.. आणि आपल्या प्रज्ञेच्या,जोरावर जगातील सर्वश्रेष्ठ असे संविधान निर्मीत केले.

संविधान निर्मितीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे . म्हणुनच त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हटले जाते .





संविधानातील तरतुदी 

मूलभूत अधिकार (न्याय प्रविष्ट ) , कायद्यामुळे समानता, विचार व अभिव्यकी स्वातंत्र्य, कल्याणकारी राज्य साठी मार्ग दर्शक तत्व , स्वतंत्र कायदेमंडळ, न्याय मंडळ. निर्माण करण्यात आले आहेत .

      कायदेमंडळ,न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ,आणि मीडिया ही लोकशाहीची आधार स्तम्भ आहेत.. लोकशाही च्या संवर्धनासाठी ही स्वतंत्र पणे काम करतील या साठी तरतूद केली आहे.

      लोकशाही म्हणजे फक्त बहुसंख्याकांच्या अधिकाराचे संरक्षण करत असून अल्पसंख्याकाना ही हक्काची ग्वाही ,आणि सुरक्षेची हमी देते.. अनेक धर्म,जात,पंथ,भाषा असलेल्या आपल्या देशात हे फक्त लोकशाही च्य तत्वाने च शक्य होऊ शकते . चेक अँड balance हा लोकशाही व्यवस्थेचा आकर्षक सिद्धांत आहे.. न्याय्य व्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणा यांच्यामधे सुयोग्य सांगड घालण्यात आली आहे.


   लोकशाही मधील विरोधी पक्षाचे स्थान:

सरकार वर लोकप्रतिनिधी द्वारे नियत्रंण हे लोकशाहीचं मूलभूत वैशिष्ट आहे..विरोधी पक्ष हा सरकारला जाब विचारत असतो . एक प्रकारे संसदे तर्फे विरोधी पक्ष सरकार वर नियंत्रण ठेवत असते ..

लोकशाही मध्ये विरोधी मताच महत्व 

 "तुमचं विरोध मी माझ्या बुद्धीच्या जोरावर खोडून काढीन पण तुम्हाला तुमचा विरोध मांडता यावा यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन.." 

   व्हाल्टेअर फ्रेंच राजकीय तत्वंज्ञ (१६९४-१७९८)

   या वाक्याचा आधार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता . या वरून आपल्या लक्षात येईल की विरोधाला ही मान्य करण्याचं धाडस बाबासाहेबांनी, घटनाकारांनी दाखवले होते...मात्र आज आपण पाहतो की सत्ता मिळाली की विरोधाची गळचेपी करण्यासाठी यंत्रनेचा वापर केला जातो.. लोकशाही व्यवस्था प्रत्येकाला आपली जागा दाखवण्यास समर्थ आहे.. सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी, सर्वसमावेशक धोरण अमलात आण्यासाठी करावा. सत्ता मिळाल्यावर व्यक्तीचं खर रूप उघडकीस येत असते.. अमेरिकेच्या महान माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचं सुप्रसिद्ध वाक्य या प्रसंगी लागू पडते.

"Nearly all men can withstand adversity, but if you want to test a man’s character, give him power.” - 

व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तपासायचे असेल तर त्या व्यक्तीला सत्ता, अधिकार द्या. प्रत्येक गोष्टीची नागरिक नोंद ठेवत असतात.. मग सत्तांतर करणे हे पण आपल्या हातातच असते ..

   आज आपण संविधान दिनानिमित्त आपल्या संविधानाच रक्षण करणे ही आपली नैतिक जवाबदारी आहे असं मानून तिच्या संरक्षणासाठी कटिबध्द राहण्याची प्रतिज्ञा करूयात... कारण आपण भारताचे लोक भारताचे भाग्यविधाते आहोत...

प्रलय भारत सावंत

२६ नोव्हेंबर २०२२


2 comments:

महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...