Monday, 5 December 2022

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏



        "तू दाखविली जगाला नवी मानव नीती

         तुझी ख्याती गाजते या जगती

         लोटून गेले वर्ष किती

       तरी आजही बोलवते ती चैत्त्यभूमीची माती."

      

          ६ डिसेंबर १९५६ रोजी मानवतेचा मुक्तिदाता , अस्पृश्यांचा कैवारी,स्त्री उद्धारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले .. बाबासाहेबांचे आणि मानव जातीचे घनिष्ट असे नाते आहे.. मानवी हक्कासाठी , रक्तविरहित मार्गानें लढणारे ते युगपुरुष होते. म्हणूनच त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतातून जनसागर चैत्यभूमीवर येतो.  

         डॉबाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजले, आणि भारतीयांच्या आयुष्यात न्यायाचा,समतेचा, बंधुत्वाचां, लोकशाहीचा सुगंध पसरवून गेले.

          बाबासाहेबांचं अलौकिक कार्य त्यांना अजरामर करून गेले.. त्यांची प्रेरणा,स्वप्न., भारतीयाच्या मनात जीवंत आहेत. शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा.. हा त्यांचा संदेश आजही अनेकांना आपला मार्ग दाखवत आहे..शिक्षणाचं महत्त्व त्यांनी खालील शब्दात विषद केले आहे 

       शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

    - डॉ बाबासाहेब आंबेडकर(१८९१-१९५६)

शिक्षणामुळे माणसाचा स्वाभिमान जागृत होतो..तो आपल्या अणि इतरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रेरणा देतो . शिक्षणानेच राष्ट्राची उन्नती होतें.त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तुम्ही तुमच्या शिक्षणाने भारताची घटना लिहून आपल्या देशाचे भाग्य ठरवले . तुम्ही भारताचे भाग्य विधाते ठरला..

    हजारो वर्ष प्रचलित असलेल्या मनुस्मृती वर आधारलेल्या व्यवस्थेला, विषमतेला, नेस्तनाबूत केले..बाबाआपण लिहलेल्या संविधानान आपला भारत देश चालतो..संविधानाची प्रत्येक तरतूद तुमची आठवण करून देते.

     बाबा तुम्ही दिलेले अधिकार, शेतकऱ्यांचे ,कामगारांचे, स्त्रियांचे,समतेचा, न्यायाचा अधिकार दररोज तुम्ही सोबत असल्याची जाणीव करून देतात.  तुम्ही दाखवलेली नवी आर्थिक किरणे भारताला आज मार्गदर्शक ठरत आहेत.भारत भूमीवर बुद्ध धर्म स्वीकारून पुन्हा या भूमीवर प्रज्ञा ,शील, करुणा आणि पंचशील यांना पुनर्जीवित केले..

  आपल्या १८९१-१९५६ एवढ्या कारकीर्दीत ऐतिहासिक रक्तविरहीत सामजिक क्रांती घडवून नवा मापदंड निर्माण केला...आपण कायदेतज्ञ,पत्रकार,घटनातज्ञ, अर्थतज्ज्ञ,मानववंश शात्रज्ञ इ.होता.

 आपल्या थक्क करणाऱ्या प्रवासाकडे पाहून आपला

"Life should be great than long". हा संदेश सार्थ ठरतो...

अशा या ज्ञानाच्या महासागरास, मुक्तिदात्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🙏🙏


जय भीम 

प्रलय भारत सावंत

६ डिसेंबर २०२२


10 comments:

  1. 👌 व्यवस्थेला बदलायला भीमच लागतो

    ReplyDelete
    Replies
    1. हो सर. भिमच लागतो व्यवस्था बदलायला....

      Delete
  2. माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार मिळून देणाऱ्या क्रांतिसूर्य यांना विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. प्रज्ञासूर्य..... मानवाला मानवी मूर्त स्वरूप बहाल करणाऱ्या महामानवाला अभिवादन 🙏🏻🌼🌼🌼🙏🏻

    ReplyDelete

महाड सत्याग्रह २० मार्च १९२७ !!

तहानलेल्या पाखरांवर तू उपकार केलेस, एकच ओंझळी प्यायलास आणि सारे तळे चवदार केलेस ..  महाड सत्याग्रह हा सामाजिक समतेसाठी केलेला लढा होता.प्रचल...